पोलीस कोठडीतील अत्याचार आणि मृत्यूंबाबत ‘झिरो टॉलरन्स’ धोरण स्वीकारायला हवे.
‘कायद्याचं राज्य कोलमडते जेव्हा त्याची जागा ‘मत्स्यनया’ घेते.’ ‘मत्स्यनया’ म्हणजे ‘जंगलाचा कायदा’, जिथं मोठा मासा छोट्या माशाला खाऊन टाकतो. कौटिल्य असं म्हणतात की, जर शिक्षेचा वापर केला नाही तर मत्स्यनया अवस्था येते. पोलिसांची चौकशी करण्याची आणि वागण्याची पद्धत सुधारण्यासाठी त्यांच्या प्रशिक्षणातच त्यावर लक्ष केंद्रित केलं पाहिजे, हे आता वेगळं सांगण्याची गरज नाही.......